Tuesday, June 19, 2012

एक नाटकी कविता


"एक झुंज वा-याशी ?"

"हे असं घडलच कसं ?"

तुमच्यासारखे "नटसम्राट"

"कुणीतरी आहे तिथं" म्हणत

पळवाटीचा "पर्याय" शोधू शकले नाहीत ?

समाजाचं सोडा हो.

तिथे "तो मी नव्हेच" चा बुरखा घालून वावरता येतं

आणि बुरख्याआडच्या "बेबंदशाही"त

"कट्यार काळजात घुसव"ताही येते.

"गिधाडां"सारखं हे वागणं

प्रत्यक्षात मात्र "आई रिटायर होतेय" म्हणत

"संत ज्ञानेश्वरां"चा आव आणायचा ?

पण रावसाहेब

यांनाच म्हणायचं खरा "पुढारी"

"वाडा चिरेबंदी" ठेवून 


"दुसरा सामना" खेळण्यासाठी सज्ज.


-प्रा. राम प्रकाश किन्हीकर

(या कवितेत १९८० च्या दशकातल्या काही नाटकांचे संदर्भ आले आहेत कारण ही कविता १९८९ च्या आसपास केलेली आहे. मी १२ व्या वर्गात होतो आणि नागपूरला नाटकांचे फ़ारसे दौरे होत नसत. आणि चांगलं नाटक, वाईट नाटक यातला फ़रक कळण्याजोग त्या विषयात गुंतलो नव्हतो. मुंबईला १९९५ मध्ये गेलो आणि प्रचंड नाटकं पाहिलीत. तत्पूर्वी धामणगाव येथल्या एक वर्षाच्या वास्तव्यात नाट्यविषयक जाणीवा घासूनपुसून लख्ख झाल्या होत्या. आमच्या नाटकांचे दिग्दर्शक डॊ. सुभेदार सर आणि माझे परममित्र श्री. अनंत मावळे यांच्या सहवासात नाटक कशाशी खातात हे कळलं)



No comments:

Post a Comment